
भारताच्या विकास प्रवासाची 12 वर्षे आणि विकसित भारतच्या संकल्पनेचा उत्सव साजरा करण्यासाठी, मायगव्ह देशभरातील नागरिकांना विकसित भारत क्विझ 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.
हा आकर्षक उपक्रम सहभागींना गेल्या बारा वर्षांतील भारताची प्रगती आणि कामगिरी जाणून घेण्याची संधी देतो. हा क्विझ पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, शिक्षण, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, सामाजिक कल्याण, नवकल्पना आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या स्वप्नासारख्या महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करेल.
क्विझचा उद्देश जागरूकता वाढवणे, नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे व मजबूत, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज भारताला आकार देणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचा उत्सव साजरा करणे हा आहे.
पारितोषिक –
क्विझमधील टॉप बेस्ट परफॉर्मरला ₹51,000/- चे रोख पारितोषिक दिले जाईल.
दुसऱ्या बेस्ट परफॉर्मरला ₹31,000/- रोख पारितोषिक दिले जाईल.
तिसऱ्या बेस्ट परफॉर्मरला ₹21,000/- रोख पारितोषिक दिले जाईल.
पुढील टॉप 50 स्पर्धकांना प्रत्येकी ₹4,000/- चे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाईल.
याव्यतिरिक्त, पुढील 100 स्पर्धकांना प्रत्येकी ₹3,000/- उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाईल.
सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.
1. क्विझ सर्व भारतीय नागरिकांसाठी खुले आहे.
2. सहभागी ‘प्ले क्विझ’ वर क्लिक करताच क्विझ सुरू होईल.
3. कर्मचारी, जे क्विझच्या आयोजकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत, ते क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र नाहीत. ही अपात्रता त्यांच्या तात्काळ कुटुंबातील सदस्यांनाही लागू होते.
4. विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी सहभागींचे मायगव्ह प्रोफाइल अद्ययावत आणि अचूक असणे अनिवार्य आहे.
5. हे वेळेवर आधारित क्विझ आहे: 10 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुमच्याकडे 300 सेकंद असतील.
6. एक सहभागी फक्त एकदाच क्विझ प्रयत्न करू शकतो. क्विझ मधून सहभागी अपात्र ठरल्यास एकाच सहभागीकडून अनेक प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
7. क्विझ जिंकण्यासाठीचे निकष म्हणजे 300 सेकंदांच्या आत सर्व योग्य उत्तरांची उत्तरे देणे.
8. निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, विजेत्यांची निवड प्रणालीद्वारे निर्मित यादृच्छिकीकरण पद्धतीद्वारे केली जाईल. सर्व अचूक उत्तरे देणे आणि विहित वेळेत सबमिशन करणे यासह, नमूद केलेले क्विझ जिंकण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींचा पात्र प्रवेशिकांच्या एका केंद्रीकृत गटात समावेश केला जाईल. विजेत्यांची निवड केवळ स्वयंचलित यादृच्छिक निवड प्रक्रियेद्वारे केली जाईल.
9. सहभागींनी कोणत्याही सुधारणा किंवा पुढील अपडेटसह क्विझ स्पर्धेच्या सर्व नियम आणि अटींचे पालन करावे.
10. निष्पक्षता आणि समान संधी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, प्रत्येक कुटुंबातील केवळ एक सदस्याचा विजेत्यांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी विचारात घेतला जाईल.
11. क्विझमध्ये सहभागी होताना, बनावट ओळख धारण करणे, दुहेरी सहभाग इत्यादींसह परंतु इतकेच मर्यादित नसलेल्या कोणत्याही अयोग्य/बनावट साधनांचा/गैरप्रकारांचा वापर आढळून आल्यास, तो सहभाग रद्दबातल ठरवून नाकारण्यात येईल. क्विझ स्पर्धेचे आयोजक या संदर्भात अधिकार राखून ठेवतात.
12. विजेत्यांची निवड blog.mygov.in वर जाहीर केली जाईल आणि कार्यक्रमाचा पुढील तपशील विजेत्यांना अधिकृत संपर्काद्वारे कळवला जाईल. अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास, आयोजक कोणत्याही वेळी स्पर्धेच्या नियम आणि अटींमध्ये सुधारणा करण्याचा किंवा योग्य वाटल्यास स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवतात.
13. आयोजक हरवलेल्या, उशिरा किंवा अपूर्ण असलेल्या किंवा संगणकाच्या त्रुटीमुळे किंवा आयोजकांच्या वाजवी नियंत्रणाच्या पलीकडे असलेल्या इतर कोणत्याही त्रुटीमुळे प्रसारित न झालेल्या प्रवेशिकांची कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाहीत.
14. कृपया नोंद घ्या की प्रवेशिका सादर करण्याचा पुरावा म्हणजे त्याचा पावतीचा पुरावा नाही.
15. सर्व विवाद/कायदेशीर तक्रारी केवळ दिल्लीच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन आहेत. यासाठी होणारा खर्च पक्षकार स्वत: उचलतील.
16. पुढील नियम व अटी यापुढे भारतीय कायदे आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या निर्णयांच्या अधीन राहतील.